*जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून विरई येथे गोरगरिबांना अन्नधान्यासह माॅस्कचे वाटप.*

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
चंद्रपूर –आज गुरुवार, दि. १४ मे. कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी लागू केली गेली आहे. त्यामुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरिबांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशा निराधारांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याची मदत व्हावी या भावनेतून आणि अशा कठीण परिस्थितीत मॉस्कचाही उपयोग व्हावा हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज मुल तालुक्यातील विरई येथे जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी गरजू आणि निराधारांना अन्नधान्याच्या कीटसह गावात अनेकांना माॅस्कचे वाटप केले.
यावेळी त्यांसमवेत, सरपंच शरद जेंगठे, रमाकांत वाढई, नंदू वाढई यांसह आदि मंडळी उपस्थित होते.
हे विशेष
Maharashtra News Media सच की आवाज