*मौदा तालुक्यात युरिया खताचा तुटवडा*
*कृत्रिम तुटवडा निर्माण करत असल्याचा शेतकऱ्यांच्या आरोप

– विलास भोयर*
मौदा– सध्या खरिपाच्या हंगाम सुरू असून मौदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली आहे तसेच अनेक शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन पीक बहरलेले आहे त्यामुळे पिकाच्या या काळात वाढ होण्याच्या दृष्टीने युरिया खताची आवश्य ता असते पण मौदा तालुक्यात अनेक कृषी केंद्रात युरिया हे खत उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना कृषी केंद्र वेवसायिक यांचेंडून सांगण्यात येते एक प्रकारे हा कृत्रिम तुटवडा निर्माण करत असल्याचा आरोप मौदा येथील शेतकरी विलास भोयर यांनी केला आहे त्यामुळे कृषी विभागाने या समस्येची त्वरित दखल घेवून सर्व कृषी केंद्रावर शेतकऱ्यांना युरिया खत सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे कारण सध्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या पिकाला युरिया सारखे खत मिळाले नाही तर पिकाच्या सरासरी उत्पन्न वर परिणाम होण्याची शेकयेता जास्त आहे असे मत भोयर यांनी वेक्त केले.
Maharashtra News Media सच की आवाज