*पुर पीडितांना तातडीने मदत करा- चंद्रशेखर बावनकुळे*

विशेष प्रतिनिधि- मौदा
मौदा ः दिनांक २८/८/२०२० ला पेच धरणाचे पाणी सोडल्याने मौदा व कामठी तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले.

*पाणी शिरल्यामुळे व गावातील लोक अस्ताव्यस्त झाले.गावात पाणी शिरल्यामुळे पाहणी करण्यासाठी मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब* (सरचिटणीस,भाजपा महाराष्ट्र प्रदेश),
*श्री.टेकचंदजी सावरकर* (आमदार, कामठी विधानसभा), *श्री.अनिलजी निधान*(विरोधी पक्ष नेते जिल्हा परिषद), *श्री.नरेशजी मोटघरे* (उपाध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा), व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

*मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब* यांनी गावातील लोकांना धिर देत म्हटले की.जिल्हा अधिकारी व पालकमंत्री यांनी सदर क्षेत्राचा तात्काळ दौरा करावा व संपूर्ण व संपूर्ण नुकसानभरपाई सोबतच पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करून घर बांधकामाकरिता तात्काळ अनुदान द्यावा.ज्या ज्या शेकर्यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान झाले त्या पिकांना ५० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यावं.
जिल्हाअधिकारीनी सर्वे करावा व जे लोक पुरात अडकले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी NDRF ची टिम तात्काळ बोलवावी व त्यांना बाहेर काढाव अशी मागणी केली.
Maharashtra News Media सच की आवाज