*मोवाड येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट कधी लागणार ?*

*पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष – स्थानिक नेत्यांनी द्यावे लक्ष*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
मोवाड – येथील कोल्हापूरी बंधा-याचे अजून पर्यत गेट खुले असल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. पावसाळा संपुण १ महीना झाला आहे. वर्धा नदी मंद अवस्थेत वाहत आहे. मोवाड शिवारातील शेतीला पाणिपुरवठा करणाऱ्या बंधा-याचे अजून पर्यंत गेट बंद झाले नाही. वर्धा नदीच्या पाण्यावर मोवाड शहराच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अवलंबून आहे.
कोल्हापूरी बंधा-याचे गेट न लागल्याने शहरात पाण्याचे संकट येईल अशी परिस्थिती निर्माण होईल . व संत्रा उत्पादक शेतकरी यांना पाण्या अभावी संत्रा बागा वाळेल की काय अशी चिंता निर्माण होत आहे.
दर वर्षी या कोल्हापूरी बंधा-यावर पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शहरातील शेतकरी चिंतेत आहे. तरीही या कोल्हापूर बंधारे चे तात्काळ दरवाजे लावावेत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर मोवाड शहरातील शेतकऱ्यांना कडून जोळधरत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज