*वर्करच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी*
*नगरसेविका संध्याताई रायबोले यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी – कामठी येथील प्रभाग १५ चे नगर परिषद चे स्वच्छता कर्मचारी विजय गणेश बरोंडे आणि गौतम नगर छावणी येथील सौ विणाताई धम्मरत्न तांबे, तिरंगा चौक रामगढ येथील लक्ष्मीताई रामकृष्ण ऊके या दोन अंगणवाडी सेविकांचा कोरोना प्रार्दुभावाने खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान अकाली मृत्यू झाला असून या तीनही फ्रंट लाईन हेल्थ वर्कर ला शासन नियमानुसार प्रत्येकी 50 लाख रुपयांचे विमा कवच देऊन मदत करावी अशी मागणी प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका संध्याताई उज्वल रायबोले यांनी जिल्हाधिकारी मा.श्री रविंद्र ठाकरे
यांना निवेदना द्वारे केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद चे सीईओ योगेश कुंभेजकर ,एस.डी.ओ श्याम मदनूरकर ,सि.ओ संदिप बोरकर , तहसीलदार अरविंद हिंगे सह आदि उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज