नारंडा ते पिपरी रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात

अँड संजयभऊ धोटेच्या प्रयत्नातून
आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना आदिवासी तालुक्यातील नारंडा ते पिपरी या रस्त्याच्या बांधकामाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. अँड.संजयभाऊ धोटे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी खनिज विकास निधी(५० लक्ष) अंतर्गत कोरपना तालुक्यातील नारंडा ते पिपरी रस्त्याच्या बांधकामाला सुरवात केल्याने अगदी च येथील शेतकऱ्यांच्यां ये – जा .करण्यासाठी आज सोयीस्कर झाल्यामुळे अँड. संजयभाऊ धोटे यांचे अभिनंदन होतांना चर्चा दरम्यान दिसून येते आहे .या रस्त्याची मागणी बऱ्याच दिवसा पासून होती आणी आज ही मागणी पुर्णपणे झाल्याचे
चित्र दिसत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज