*देशाला CAA, NCR ची नव्हे तर NRU ची गरज*
*देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बेरोजगार युवक युवतींशी केला विश्वास घात*

*हरपालसिंग (राष्ट्रीय महासचिव युवक काँग्रेस)*

*सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या कार्यावर समाधान व्यक्त केले*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*
*सावनेरः सद्याच्या घडीला “बेरोजगारी” ही आपल्या भारत देशातील सर्वात मोठी समस्या असुन याकडे केन्द्रात असलेल्या मोदी सरकारचे सपशेल दुर्लक्ष आहे.प्रसार माध्यमे सुध्दा या विषयावर हात घालण्यास घाबरत आहे.जर असेच चित्र पुढेही असल्यास देशातील युवक पंतप्रधान मोदींना धडा़ शिकवील्या शिवाय राहणार नाही असे यनोगत राष्ट्रीय युवक काँग्रेस चे महासचिव हरपालसिंग यांनी व्यक्त करत म्हटले की नोटबंदी,जीएसटी,मुळे देशातील संपूर्ण व्यवसाय डबघाईस आला आहे,नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाउस व नापिकीमुळे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत,देशातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे देशातील अर्थ व्यवस्था कोलमाडून पडत आहे व केन्द्र सरकार नागरिकत्व सुधार कायदा (CAA) व NCR सारख्या कायद्यांना देशवासीयांवर लादन्याचा हट्ट करत आहे सद्या देशाला वरील कायद्याची नव्हे तर राष्ट्रीय बेरोजगार रजिस्ट्रेशन NRU म्हणजेच नँशनल रजिस्टर आँफ अनएम्प्लामेंट ची गरज आहे.व त्याकरीता मा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वात व पुढाकाराने युवक काँग्रेस व्दारे संपूर्ण देशात बेरोजगार युवक युवतींची नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेतला असुन त्याकरीता बेरोजगार युवक युवतींनी आपले नाव नोंदविन्या करिता 8151994411 या भ्रमनध्वनी वर मीस काँल देऊण आपले नाव नोंदवावे व त्याकरीता सर्व युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊण बेरोजगार युवक युवतींना नाव नोंदणी करीता प्रोत्साहीत करावे असे आव्हान सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस व्दारे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून याप्रसंगी करण्यात आले*

*तसेच मा.कँबीनेट मंत्री सुनील बाबू केदार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नागपूर जिल्ह्या सह सावनेर विधानसभा क्षेत्रातील युवक युवती युवक काँग्रेसच्या लोकाभिमुख समाज कार्यावर विश्वास करून मोठ्या प्रमाणात यूवक काँग्रेस मधे शामील होत आहे.व याचे उदाहरण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नीवडनुकीत युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्तेयांनी पुढाकार घेतल्याने सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात विरोघकांना एकही जिगा मीळवता आली नाही व जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता स्थापन झाली असे ठाम मत व्यक्त करत देशातील युवकच देशाला नवीन दीशा देऊण प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो असे मत व्यक्त करत सावनेर कळमेश्वर विधानसभा युवक काँग्रेसच्या कामावर समाधान व्यक्त केले*
*याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी विजयसिंग,नागपूर जील्हा प्रभारी नल्लमवार,जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल सीरीया,सावनेर कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे,महासचिव अजय डाखोळे प्रामुख्याने उपस्थित होते*

*काल्यक्रमाचे संचालन प्रविण झाडे यांनी तर प्रास्ताविक राजेश खंगारे व आभार अजय डाखोळे यांनी मानले कार्यक्रमाला सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आयोजनाचे समापन शहर काँग्रेस कमेटी कार्यालय बस स्थानक ते गांधी पुतळा अशी पदयात्रा करत राष्ट्रीय बेरोजगार रजिस्टर (NRU) बद्दल जनजागृती करण्यात आली*

*आयोजनाच्या यशस्वीते करिता अमोल केने, प्रवीण जाड़े,चंदु कामदार,इमरान शाह, प्रदीप प्रसाद, विष्णु कोकडडे,राहुल सीरिया,मोहित गिरी, दीपक धोबड़े,मनीष धोटे,सुरज रॉउत, राजेन्द्र चौहान, मनोज फ़कीड्डे,रूपेश कमाले, मोहन कमाले, विनीत पाटील, गोलु लांडगे, वैभव अड़वू, पवन पाटमासे,स्वपनिल महाजन,मोहन कमाले, मुकेश इंगोले, राकेश सूर्यवंशी,राहुल ठाकरे,हिमांशु बटोले, भानु ,नीलेश नकाशे, सोहेल शेख,आकाश कमाले, विजय पन्नामी,अभिजीत हिंगने, मोनु नकाशे,रोशन घ्यार,आदींनी परिश्रम घेतले*
Maharashtra News Media सच की आवाज