*संकटात धावून येणार्या सामाजिक संस्थांचे मानले आभार*

*पालकमंत्री सुनील केदार यांचा पुढाकार*
*विशेष प्रतिनिधी वर्धा*
*वर्धाः कोरोनामुळे आपल्या जिल्ह्यात अडकलेल्या साडेतीन हजार मजुरांची व्यवस्था स्थानिक स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र येऊन केली आहे.जिल्ह्याच्या स्वयंसेवी संस्थांनी यात आपला मोठा योगदान दिला आहे.संस्थांची ही मदत या संकटाच्या काळात माणुसकी शिकवणारी आहे.वर्धेच्या विश्रामगृहात सामाजिक संस्थांची बैठक घेण्यात आली*
*यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार , आमदार रणजित कांबळे,उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.एवढंच नव्हे तर जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटनांकडून कुणीही उपाशी राहू नये याकरीता पुढाकार घेतला आहे.*
*संकटाच्या काळात धावून येणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांचे शतशः आभार मानले.*
Maharashtra News Media सच की आवाज