*विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार “सह्याद्री’, वाचा काय आहे प्रकरण…*

विशेष प्रतिनिधि-विश्वास बांगरे
शहरसह ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे इंटरनेट व अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही. अशा मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून “टिलीमिली’ कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणांचे धडे दिले जाणार आहे
कोरोनाच्या नियंत्रणासाठी गेल्या 16 मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्या अद्यापही उघडलेल्या नाहीत. सोबतच विद्यार्थ्यांनाही वार्षिक परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेशितही करण्यात आले आहे. घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे सुरू होण्याबाबत अनिश्चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Maharashtra News Media सच की आवाज