*10- 12 वी च्या परिक्षा ठरल्या वेळेवरच होणार*
वर्धा विशेष जिल्हा प्रतिनिधी – सुरेशकुमार बरे

*शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या १० वी व १२ वी संबंधीच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत घेण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे-*
1) १० वी व १२ वी *परीक्षा* ठरलेल्या *वेळापत्रकानुसार आॕफलाईनच होणार*
2) विद्यार्थी *ज्या शाळेत अथवा काॕलेजमध्ये शिकत आहे तेच त्यांचे परीक्षाकेंद्र* असणार
3) *यंदा ८० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास तर ४० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढीव* मिळणार
४) *१० वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा दरवर्षीप्रमाणे न होता* आता विद्यार्थ्यांना त्याऐवजी दिलेल्या कालावधीत *Assigenment जमा करावे लागणार आहे..* मात्र १२ वी च्या प्रात्यक्षिक परीक्षा ज्या होणार आहेत ते त्या त्या काॕलेजमधून त्या संबधी तशा सुचना विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज