*विद्यार्थ्यांनी शाळा परीसरात राबविला स्वच्छता अभियान*


सावनेर प्रतिनिधि-सूरज सेलकर
सावनेर –अरविंद इंडो पब्लिक स्कूल च्या वतीने “स्वच्छता ही सेवा“अभियान राबविण्यात आली*
*या अभियाना अंतर्गत विद्यार्थी विद्यार्थ्यीनींनी मोठ्या प्रमाणात श्रमदान दिले आपला परिसर कसा स्वच्छ करावा याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या गाण्यातून आणि नृत्यातुन व्यक्त केले.स्कूलचे प्राचार्य डॉ.राम कुमार शर्मा सर यांनी स्वच्छता अभियाना बद्द्ल विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून दिले तसेचया कार्यक्रमाला शारीरिक शिक्षिका मीना अजमेरा,ज्योती पारधी, वैशाली जाधव, स्मिता अटालकर, समीर उईके व इतर शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनि सुध्दा सहभाग दिला.*

*याप्रसंगी प्राचार्य डॉ राम कुमार शर्मा यांनी आपल्या संबोधनातुन विद्यार्थ्यांना सांगीतले की स्वच्छता हाच यशाचा खरा मार्ग असुन आधी स्वतः मग घर नंतर परिसर व मग गाव असे धोरण सर्वांनी अंगीकु्त केल्याने स्वच्छता नांदेल व पर्यावरण राखल्या जाईल अश्याच प्रकारे आपल्या अभ्यासात ही नेटनेटके पणा असने आवश्यक आहे सुबक अक्षर,वह्या पुस्तके सोबतच स्वताःचे शरीर ही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे,स्वच्छ शरीर,स्वच्छ घर,परीसर तर आरोग्य ही सुदु्ढ राहते व परिसरातील वातावरण सुद्धा प्रफुल्लीत राहण्यास मदत मीळते म्हणूनच शासनाव्दारे स्वच्छता अभीयान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगीतले*
Maharashtra News Media सच की आवाज