*घराला आग लागून लाखोची राखुंडी ; जिवंत हानी नाही*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः तालुक्यातील केळवद पैलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बिडगाव येथील शेतकरी शामराव सरोदो व चिंतामण सरोदे यांच्या शेतीतील घराला पहाटे 4-00 चे दरम्यान आग लागल्याने लाखोचे शेतीविषयक साहित्य जळून राख झाले*

*मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी श्यामराव सरोदे व चिंतामण सरोदे यांच्या शेतातील घराला पाहटेच्या दरम्यान अज्ञात करणाने आग लागल्याने शेतीविषयक सींचन पाईप,विद्युत मीटर स्टार्टर,सोलर सींचन पंप,शेतीविषयक लाकडी अवजार इत्यादी लाखोचे साहित्य जळून खाक झाले.सुदैवाने शेतातील घरात गुरे ढोरे नसल्याने जिवीत हानी टळली.सदर घटनेचे माहिती जटामखोरा रायबासाचे सरपंच सोनू रावसाहेब यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेत बिडगावचे तलाठी व संबंधितांना घटनेची सुचना दीली.सुचना मिळताच तलाठी,कोतवाल आदींनी घटनास्थळी पोहचून घटनास्थळ पंचनामा आदी सह लाग लागन्याचे कारण इत्यादींचा तपास सुरू केला आहे तर शार्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी अस प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

*तर सदर अगीच्या प्रकरणात गोरगरीब शेतकर्यांचे झालेल्या आर्थिक नुकसानीची तात्काळ भरपाई मीळिवी याकरिता सरपंच सोनू रावसाहेब प्रयत्नशील आहेत*
Maharashtra News Media सच की आवाज