*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे भारुडचा कार्यक्रम संपन्न.

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे दिनांक 14 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. शंकरराव राठोड प्राध्यापक महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा तर प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. अस्मिता बागडे माजी उपसरपंच ह्याच्या उपस्थिती मध्ये श्रीमती त्रिवेणी बाई चिखले व त्यांचे सहकारी भगिनी यांनी व्यसनमुक्ती.,अंधश्रद्धा, हुंडाबळी, अत्याचार ह्याच्यावर आधारित भारुडच्या माध्यमातून नकला
सादर केल्या.

मा. श्री. राठोड सर यांनी अध्यक्ष भाषणात त्यांनी अशा प्रकारे भारुडच्या माध्यमातून जर कार्यक्रम घेतले तर निश्चितच जनमानसात सुधारणा होईल.
कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रकाश कोहळे केन्द्र संचालक यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. शालु टेकाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदा सोनुरकर, नलिनी बेडेकर, पुनम सय्यामे, सुनील उके,श्री. नरेश तरारे आशिष भालेराव, काळे.,लिचडे, नगरे, लिला तलखन्डे, पुरणकर, प्रभा सपाटे, चांदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
Maharashtra News Media सच की आवाज